मुख्य संपादक :कुलदिप सुरोशे
पुसद:- सध्या सोशल मीडियां हा जवळपास सर्वच नागरिकांच्या हातात आला आहे. यां सोशल मीडियावर सर्व नागरिक ही आपली भूमिका, प्रतिक्रियां मांडत असतात परंतु काही समाजकंटक तरुण यां सोशल मिडीयचा दुरुपयोग करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा सुद्धा प्रयन्त करत आहे. अशा प्रकारांवर आळा बसने आवश्यक आहे. असाच काहीसा प्रकार आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे घडला आहे.

शेंबाळपिंपरी येथील एक 22 ते 23 वर्षीय युवकाने त्याच्या सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने काही काळ तिथे तणाव निर्माण झाला होता. यां घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी जे हे त्यांचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी सदर परिस्थिती आटोक्यात आणून सर्व नागरिकांना समजावून प्रकरण शांत केले व संशयित आरोपीला अटक केली. परंतु सदर आरोपीचे नावाने आक्षेपार्य पोस्ट केल्याने त्याला अटक केली आहे परंतु चौकशी नंतरच सदर आरोपीनेच पोस्ट केली किंवा नाही हे निश्चित सांगण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी सांगितले. कारण याआधी सुद्धा एका तरुणाने संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती व त्याला अटक करण्यात आली होती परंतु त्यानंतर चौकशी दरम्यान वादग्रस्त केलेली पोस्ट ही त्याचे अकऊंट घेऊन दुसऱ्याच व्यक्तीने केली असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यामुळे यां प्रकरनात सुद्धा संपूर्ण चौकशी करून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच नागरिकांनी सोशल मिडीयचा वापर जपून करावा, सोशल मीडियावरील कोणत्याही आक्षेपार्य पोस्टला लाईक, कमेंट करू नये तसेच सदर पोस्ट बद्दल संपूर्ण शहानिशा करण्यात यावी आणि असे वादग्रस्त पोस्ट दिसल्यास त्वरित पोलिसांना सूचना द्यावी आणि अफवानवर विश्वास ठेवू नये असे जाहीर आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

