मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेत आपल्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवुन पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाणही उद्वस्थ करून त्यांना सडेतोड उत्तर दिले.

भारतीय संरक्षण दलाच्या व कणखर सरकारच्या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आज दिनांक १९/०५/२५ रोजी सकाळी ९:०० वाजता यशवंतरंग मंदिर स्टेडियम येथुन भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते .

सदर रॅलीत जाती , पाती, पंथ व पक्ष विरहित या भव्य ” तिरंगा रॅलीत सर्व देशभक्त,माजी सैनिक, व्यापारी संघटना , राजकीय संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना , महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशावर व सैन्यावर असलेले आपले प्रेम व्यक्त केले.

सदर तिरंगा रॅली ला यशवंत रंगमंदिर येथून सुरुवात करून मुखरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,नेताजी सुभाष चंद्र बोस चौक,कापड लाईन, महात्मा गांधी चौक, व तहसील कार्यालय येथे राष्ट्रगीत गायन करून तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

