मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.एकेकाळी यवतमाळ जिल्हा हा पांढरे सोने पिकविणारा म्हणजेच कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली होती.परंतु आता यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. शासनाच्या रेकॉर्ड नुसार मागील 2024 यां वर्षात जिल्ह्यात जवळपास 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. संपूर्ण राज्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत, हे मात्र खरे..!

सततची नापिकी शेतमालाला योग्य भाव नाही तसेच बँकेचे कर्ज हे आव्हान शेतकऱ्यांन समोर उभे आहेत. अशाच संकटांना तोंड देत शेवटी पुसद तालुक्यातील बुट्टी इजारा येथील शेतकरी मधुकर तुकाराम चव्हाण यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली.

मधुकर चव्हाण हे शेंबाळपिंपरी जवळील बुटी इजारा येथील रहिवासी असून ते शेती करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते,त्यांच्यावर बँकेचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपये कर्ज असल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या दोन्ही किडन्या ह्या फेल झाले असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे. सततची नापिकी आणि पीक आले तरी त्याला योग्य हमीभाव नाही लागवडीकरिता लागणार खर्च सुद्धा निघत नाही बँकेचे कर्ज पत्नीचा दवाखान्याचा खर्च कुटुंबाचा उदरनिर्वाह या सर्वांना तोंड देत शेवटी कंटाळून सदर शेतकऱ्याने काल दिनांक 15 मार्च 2025 रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले.

याची माहिती गावकऱ्यांना होताच आज त्यांनी तातडीने मधुकर चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केले परंतु काल सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
राज्य शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्याचा फक्त देखावा करते सदर योजना फक्त कागदोपत्रीच आहे याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना होताना दिसत नाही त्यात आपल्या विधानसभेचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी मंत्री हे सुद्धा फक्त निवडणुकीपूर्तीच आश्वासने देतात मात्र ती आश्वासने निवडणूक संपली की नाहीशी होऊन जातात. या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांकडे बघणार तरी कोण शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सर्व प्रशासन फेल झाले आहे.

प्रशासनाने मधुकर चव्हाण यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व पुढे कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

