मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.19 मार्च 1986 ला देशातील पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्येची शासन दप्तरी प्रशासकीय नोंद झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात चिलगव्हाण या गावातील प्रगतशील शेतकरी सरपंच साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने आपल्या सुविध्य पत्नी मालती ताई सह चार अपत्याला घेऊन वर्धा जिल्ह्यातील पवनार दत्तपुर येथे आर्थिक नैराश्याच्या गर्तेत मानसिक तणावाखाली सामूहिक आत्महत्या करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र टाकून शेतीतील विदारक दुरवस्था जगासमोर आणली होती.

शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून 19 मार्च ला संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर शेतकरी पुत्र म्हणून लोकशाहीतील संविधानिक विधायक अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय उपवास ठेवून अन्नत्याग करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना प्रकट करणारा, हा दिवस असतो या अन्नत्याग आंदोलनात सर्वपक्षीय नेते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सामाजिक संघटना भाग घेऊन सहभागी होत असतात उद्याच्या येणाऱ्या 19 मार्चला हा कृतज्ञता व निषेध दिन म्हणून अन्नत्याग आत्मकलेश आंदोलन मध्ये समाजातील सर्व घटकांनी जात, धर्म, पंथ सोडून एक दिवस उपवास ठेवून जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजासाठी या अहिंसात्मक पद्धतीने होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे. 19 मार्च 2017 पासून या आंदोलनाला चिलगव्हाण इथून सुरुवात केली आहे.

उद्याला पुसद येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन होणार असून यात शरद मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक ली पुसद अविनाश पोळकट, संभाजीराव टेटर, जिनकर राठोड, विकास भाऊ राठोड सौ संध्याताई संदेश रणवीर उपस्थिती असून यामध्ये आपन ही सहभागी होऊन पोशिंद्या बाबत कृतज्ञता व्यक्त करावी, असे मनीष जाधव यांनी कळविले आहे.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

